लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत.
वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे.
आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
अपहरण!
लहान मुलाचे उल्फा अतिरेक्यांकडून अपहरण आणि त्यामागची सत्य घटना सांगत आहेत....
अरे सचिन त्या आधी मी सुध्दा फक्त असल्या बातम्या वाचून आणि ऐकूनच होते. अभिवाचनाचा मला थोडा ताण आला होता कारण गेले ४-५ दिवस मी सखो ने बेजार आहे. घसा तर चांगलाच बसलेला. त्यामुळे मधुन मधुन सर्दीचं सुं सुं ऐकायला आलं असेलच. बरेच अनुभव लिहायचे आहेत. वेळ मिळत नाहीये.
अपर्णा ताई, तुमची सत्य कथा सुन्न करणारी आहे यात शंकाच नाही.ईशान्य भारतासारख्या ठिकाणी जाऊन आणि राहून एक अतिशय वेगळ्या संस्कृतीची तुम्ही जी ओळख करून दिलीत ती थक्क करणारी आहे.चीनच्या सीमेला लागून असलेला हा प्रदेश/भाग,आपले आणि चीनचे ६२ च्या युद्धा नंतरचे संबंध,आणि त्या मुळे त्या भागात न करता आलेला किंवा झालेला विकास ,स्वातंत्र्या नंतरच्या ६३ वर्षात राज्यकर्त्या कडून झालेली त्यांची उपेक्षा,त्यांची उदासीनता त्या मुळे भारताचा एक भाग असूनही त्यांना आपल्या बद्दल वाटणारा दुरावा अशी आणि अजून बरीच काही कारणे ह्या प्रकारच्या संघटनांना जन्म द्यायला आणि नंतरच्या काळात त्या वयात यायला कारणीभूत आहेत.ह्या एका अतिशय वेगळ्या विषया वरचे तुमचे अजून हि काही विचार मला ऐकायला नक्कीच आवडतील. धन्यवाद.
१२ टिप्पण्या:
अपर्णा, घटना तर लक्षवेधी आहेच. मात्र उपसंहारात दिसून आलेली सामाजिक जाणीव मला जास्त कौतुकास्पद वाटते.
ताई, अतिशय भयंकर कथा.
खरतर काल रात्रीच मी ऐकली होती. यावर काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना.दोन वेळा प्रतिक्रिया लिहली आणि डिलीट केली.
या अशा घटना फक्त चित्रपटातूनच पाहिल्या आणि पेपरमधून वाचल्या. यापुढे कधी अशा घटनाचा संबंधच नाही आला.
अभिवाचन मस्त झालंय.
तु अशा घटनेच अभिवाचन केलयस की त्याला आता झकास म्हणाव की छान म्हणाव तो पण प्रश्न आहे. (मजेशीर चा प्रश्नच येत नाही.)
धन्यवाद गोळे काका. खरंतर माझ्याकडे या विषयावर लिहीण्यासारखे अजुन बरेच अनुभव आहेत. :-)
अरे सचिन त्या आधी मी सुध्दा फक्त असल्या बातम्या वाचून आणि ऐकूनच होते. अभिवाचनाचा मला थोडा ताण आला होता कारण गेले ४-५ दिवस मी सखो ने बेजार आहे. घसा तर चांगलाच बसलेला. त्यामुळे मधुन मधुन सर्दीचं सुं सुं ऐकायला आलं असेलच.
बरेच अनुभव लिहायचे आहेत. वेळ मिळत नाहीये.
अपर्णा विलक्षण वेगळा आणि सुन्न करणारा अनुभव.... तुझे अजुन अनुभव ऐकायला निश्चितच आवडतील....
अपर्णा,
घटना डोळ्यासमोर घडतेय अस वाटलं. मनास सुन्न करणारा अनुभव आहे. अभिवाचना बद्धल बोलायचे म्हणजे दिव्याने सूर्याचे तेज चाचपडणे असे होईल. झक्कास!!!!
बापरे, लहान मुलांचे अपहरण कसे काय करू शकतात ही लोकं?
अमिताभ बच्चनच्या ’एक अजनबी’ या चित्रपटाची आठवण झाली
अलताई,
अतिशय जबरदस्त लेखआहे हा..आणि तू वाचलायसही तितक्याच उत्कटतेने! छानच!
अपर्णा ताई,
तुमची सत्य कथा सुन्न करणारी आहे यात शंकाच नाही.ईशान्य भारतासारख्या ठिकाणी जाऊन आणि राहून एक अतिशय वेगळ्या संस्कृतीची तुम्ही जी ओळख करून दिलीत ती थक्क करणारी आहे.चीनच्या सीमेला लागून असलेला हा प्रदेश/भाग,आपले आणि चीनचे ६२ च्या युद्धा नंतरचे संबंध,आणि त्या मुळे त्या भागात न करता आलेला किंवा झालेला विकास ,स्वातंत्र्या नंतरच्या ६३ वर्षात राज्यकर्त्या कडून झालेली त्यांची उपेक्षा,त्यांची उदासीनता त्या मुळे भारताचा एक भाग असूनही त्यांना आपल्या बद्दल वाटणारा दुरावा अशी आणि अजून बरीच काही कारणे ह्या प्रकारच्या संघटनांना जन्म द्यायला आणि नंतरच्या काळात त्या वयात यायला कारणीभूत आहेत.ह्या एका अतिशय वेगळ्या विषया वरचे तुमचे अजून हि काही विचार मला ऐकायला नक्कीच आवडतील. धन्यवाद.
अपर्णा... अभिवचन मस्त. फक्त ते हिंदी उच्चार थोडे अजून नीट व्हायला हवे. म्हणजे अधिक लय लागेल. अर्थात आपल्या सर्वांचे हिंदी उच्चार असेच असायचे.. :D
Rohanji,Aparnji used perfect ASSAMESE/BENGALI accennt in HINDI conversation.Hindi diolouges are perfect.
Aparnaji's experince was heart rending.
टिप्पणी पोस्ट करा